नितिन बानुगड़े पाटील..
प्रा.नितिन संपतराव बानुगड़े पाटील हे सातारा येथील रहिमतपुर गावाचे प्राध्यापक..संपूर्ण आयुष्य लोक कल्याण आंणि जनजागृती करत झट आहेत. शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे मराठे यांविश्यिचे गाढे आभ्यासक. आपल्या विचारातून लोकजागृती व्हावी हा एकच ध्यास.
नेहमीच त्यांच्याविषयी एक कुतूहल होते मनात.त्यांच्या शब्दांत तर एक जादूच आहे..त्यांचे शब्द कोणी ऐकले की अंगावर कटा उभारतो,मन संचारते.या नव वर्षात त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळेल असे वाटलेच नव्हते.आणि ते साईं मित्र मंडल व हिन्दू मित्र संघ च्या वर्धापन दिना निमित्त येणार आहेत हे कलले तेव्हा खुप आनंद झाला.
पूर्ण कार्यक्रम मस्त झाला.मी तर समोरच बसलो होतो.पप्पा सुद्धा होते माझ्या बरोबर होते.आधी सत्कार केल्यावर मग त्यांनी मंच स्वत:च्या ताब्यात घेतला.सुरुवातच महाराष्ट्राच्या मातीपासून सुरु केली आणि तिथेच प्रेक्षकांची मने जिंकली.
हे काही त्यांच्या भाषानातील मुद्दे:
१. निसर्गाच रंग हिरवा पण आम्ही त्याला मुस्लिम म्हणत नाही....
सुर्याचा रंग भगवा ,म्हणून आम्ही त्याला हिन्दू म्हणत नाही..
सागराच रंग निला,म्हणून आम्ही त्याला बौध्ह म्हणत नाही..
२. शिवाजी उलटे वाचले की जिवाशी ...इतका हा राजा जिव लावणारा होता..
३. स्त्री -भ्रूण हत्या ,मुलांच्या आत्महत्या,आणि राज कारभार..
४.आरमार,अंगरक्षक,धर्मं-समानता.
५.मुलान्वरिल संस्कार..